शुक्रवारी पणजीत महाआंदोलनाचा वणवा

युनिटी मॉल, प्रशासन स्तंभाविरोधात चिंबलवासिय आक्रमक

गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी)

चिंबलच्या पठारावर आणि तळ्यार तळ्याला भविष्यात धोका निर्माण करणारे युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ हे दोन्ही प्रकल्प रद्द करूनच समाधान मिळणार, असा निर्धार चिंबलवासियांनी केला आहे. या आंदोलनाचे उग्र रूप म्हणून शुक्रवार, ३० रोजी पणजीत महाआंदोलन होणार असून हजारोंच्या संख्येने लोक राजधानीत रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा गोविंद शिरोडकर यांनी केली.
आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चिंबलवासियांनी बांबोळी येथील शासकीय कार्यक्रमस्थळी आंदोलन केले. अंगाला झाडांच्या वेलींनी कवटाळून आणि हात बांधून त्यांनी हे सांकेतिक आंदोलन केले. प्रजासत्ताक म्हणजे शासनाची मूळ सत्ता नागरिकांकडे असणे. नागरिक गेले ३० दिवस आंदोलन करत आहेत, तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. अशा परिस्थितीत या सरकारला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल यावेळी करण्यात आला.
जनतेच्या भावनांची कदर करणे, जनतेला हवे ते देणे आणि जल, जमीन व जंगलांचे संरक्षण करून भावी पिढीला निश्चिंत करण्याचे कर्तव्य हे सरकारचे आहे. चिंबलवासियांच्या या आंदोलनाने सरकारची असंवेदनशीलता उघड झाली, असा आरोप गोविंद शिरोडकर यांनी केला.
आदिवासी पोलिसांचा वापर
चिंबलकरांच्या आंदोलनाला अडविण्यासाठी सरकारने प्रामुख्याने आदिवासी समाजातील पोलिस अधिकाऱ्यांचा वापर केल्याचा आरोप गोविंद शिरोडकर यांनी केला. हे म्हणजे आदिवासी समाजालाच एकमेकांविरोधात उभे ठाकण्याचा डाव असल्याने सरकार बहुजन समाजाची थट्टा करत आहे की काय, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजधानीत महाआंदोलनाचा वणवा
शुक्रवार, ३० रोजी पणजीत महाआंदोलन होणार असून राज्यभरातून आदिवासी समाज तसेच चिंबलवासियांना पाठींबा देणारे लोक हजारोंच्या संख्येने हजर राहणार आहेत. या महाआंदोलनासाठी आजपासून जनजागृती सुरू होईल. राज्यातील भाजप सरकार आदिवासी समाजाची गळचेपी करून त्यांचे भवितव्य उध्वस्त करण्यासाठी आतूर झाले आहे, हेच या दोन्ही प्रकल्पांच्या अट्टाहासातून स्पष्ट होते, अशी टीका अजय खोलकर यांनी केली. कुठल्याही परिस्थितीत हे दोन्ही प्रकल्प चिंबलात नकोत, असा वज्रनिर्धार चिंबलवासियांनी केला.

  • Related Posts

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांचा गोमंतकीयांना संदेश गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोमंतकीयांसह देश-विदेशातील भारतीयांना शुभेच्छा देताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, सामाजिक सलोखा…

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    म्हार्दोळ, दि. १३ (प्रतिनिधी) : गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्याने गुरुवारी माडदोळ येथे आयोजित ‘उटा महामेळाव्या’त पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने एसटी समाजबांधव या महामेळाव्याला उपस्थित राहिले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी चार मतदारसंघ आरक्षित झालेच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure