म्हादईप्रश्नी दर आठवड्याला अपडेट हवी

विधानसभेत आमदारांची जोरदार मागणी

गांवकारी, दि.२२ (प्रतिनिधी)

म्हादईच्या प्रश्नावर डबल इंजिन सरकार गोव्याच्या हितासाठी अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी आमदारांनी विधानसभेत केली. कर्नाटक सरकारकडून सातत्याने विविध कुरघोड्या होत असताना, गोवा सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. म्हादईविषयक न्यायालयीन लढा आणि इतर घडामोडींबाबत आमदारांना दर आठवड्याला माहिती पुरवावी, अशी जोरदार मागणी विरोधी आमदारांनी केली.
आजच्या विधानसभेत म्हादई प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. विरोधी आमदारांनी सभापती रमेश तवडकर यांच्या आसनासमोर धाव घेत चर्चा परवानगीची मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंच यांनी सांगितले की म्हादई प्रकरणावर सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. कर्नाटकला केंद्राकडून कोणतीही परवानगी मिळू नये, यासाठी दिल्लीमध्ये सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. कर्नाटक केंद्राच्या परवानगीशिवाय कामे करत आहे, परंतु ती कामे त्यांच्या राज्यात चालू असल्याने गोवा सरकार काहीच करू शकत नाही. यासंदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. अलिकडेच केंद्रीय वन आणि वातावरण बदलमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मांडल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
सभागृह समितीबाबत नाराजी
म्हादई प्रश्नासंबंधी स्थापलेल्या सभागृह समितीची बैठक जानेवारीत झाली होती, पण त्यानंतर आजपर्यंत दुसरी बैठक घेण्यात आलेली नाही. “या समितीचा उपयोग काय?” असा सवाल उपस्थित करत आमदार विजय सरदेसाई यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. समिती स्थापूनही अद्याप म्हादईची पाहणी झाली नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. जर समिती स्थापण्यात आली आहे, तर तीने विषयाचा सखोल अभ्यास करावा आणि कर्नाटकच्या कुरघोडीबाबत सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी, अशी मागणी आमदार विरेश बोरकर यांनी केली. आमदार वेन्झी व्हिएगस यांनीही सरकारच्या दुर्लक्षावर तीव्र टीका केली.

  • Related Posts

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    पणजी, दि. १९ जुलै २०२६ : मोरजी येथील तेंबवाडा येथे ॲड. अंकुर कुमार यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका वकिलावरील हल्ला नसून कायद्याच्या राज्यावर आणि न्यायव्यवस्थेवर केलेला थेट हल्ला आहे,…

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    पणजी, दि. १९ जुलै २०२६ : गेल्या दहा वर्षांत देशभरात झालेल्या १५२ प्रश्नपत्रिका फुटींच्या प्रकरणांतील आरोपींना शिक्षा झालेली नसल्याचा दावा करत, भाजप सरकार अशा आरोपींसाठी आश्रयस्थान बनल्याचा गंभीर आरोप गोवा…

    You Missed

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

    Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

    भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला

    भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला