मांद्रेत डोंगर, ताळगांवातील शेते धगधगत!

अग्निशमन दलाच्या जवानांची कसोटी

गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी)

पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि इतर किनारी गावांतील डोंगरांवर अलीकडे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे, ताळगांवमध्ये शेतातील सुके गवत साफ करण्यासाठी आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. या दोन्ही घटनांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
मांद्रेत डोंगरांवरील आगी आणि स्थानिकांचे नुकसान
मांद्रेतील आस्कावाडा, नाईकवाडा परिसरातील माळरानावर रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात आग लागली. ही आग सर्वत्र पसरून स्थानिकांच्या काजू बागायतींचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
स्थानिक युवकांनी मदत केल्यामुळेच ही आग आटोक्यात आणणे शक्य झाले. मोरजी, मांद्रे आणि किनारी भागांतील डोंगरांवर आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने हा प्रकार मानवनिर्मित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या डोंगर आणि माळरानावरील अनेक जमिनी परप्रांतीयांनी विकत घेतल्या आहेत. त्या साफ करून विकासासाठी तयार करण्याच्या हेतूने मुद्दाम आगी लावल्या जात असल्याचा अंदाज आहे. या आगींमुळे स्थानिक काजू बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे.
ताळगांवमध्ये शेतातील आगी आणि त्याचे परिणाम
ताळगांवमध्ये शेतात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढते, जे सुकल्यानंतर आग लावून साफ केले जाते. हा मोकळा परिसर असल्याने ही आग अनियंत्रितपणे पसरते.
शेतात पाणी असल्याने सुके आणि ओले गवत जळल्यानंतर गडद धूर निर्माण होतो, जो संपूर्ण परिसरात पसरतो. परिणामी शेजारील रहिवाशी वसाहतींतील लोकांना घुसमटण्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत आपत्कालीन स्थिती निर्माण होते.
सोमवारीही अशीच घटना घडल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या कष्टाने ही आग विझवावी लागली. हे प्रकार आता नेहमीचे झाले असून, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे ताळगांव पंचायतीने शेतकऱ्यांना किंवा हे प्रकार करणाऱ्यांना त्वरित ताकीद देण्याची गरज आहे. ताळगांव आणि करंझाळे परिसरात शेतातील आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, असे सिलिल रॉड्रिगीस यांनी सांगितले.

  • Related Posts

    ४३ कोटींच्या दंडाची होणार परतफेड

    स्मार्ट मीटर जनआंदोलनानंतर मुख्य अभियंत्यांची घोषणा गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)स्मार्ट मीटर प्रकल्पाअंतर्गत ग्राहकांकडून अतिरीक्त वीज वापरासाठी आकारण्यात आलेला तब्बल ४३ कोटी रुपयांचा दंड परत करण्याचे आश्वासन वीज विभागाचे मुख्य अभियंता…

    Bombay High Court Issues Notices in Taleigao Communidade Land Filling Case

    The Bombay High Court at Goa has issued notices to Panaji Mayor Rohit Monserrate and several other respondents in connection with a petition alleging illegal encroachment and dumping of earth on land belonging to the Taleigao Communidade. The matter is scheduled for its next hearing on July 28. The petition was filed by Jose Rodrigues, Eusebio Gomes and Vito Gomes, naming the State Government, Taleigao Panchayat, Taleigao Communidade, Panaji Mayor Rohit Monserrate, and other authorities as respondents.

    You Missed

    स्मार्ट मीटर की स्मार्ट राजकारण ?

    स्मार्ट मीटर की स्मार्ट राजकारण ?

    ४३ कोटींच्या दंडाची होणार परतफेड

    ४३ कोटींच्या दंडाची होणार परतफेड

    GHRC Adjourns Smart Meter Hearing to July 15; Amicus Curiae to Submit Report

    GHRC Adjourns Smart Meter Hearing to July 15; Amicus Curiae to Submit Report

    Bombay High Court Issues Notices in Taleigao Communidade Land Filling Case

    Bombay High Court Issues Notices in Taleigao Communidade Land Filling Case

    23/06/2026 e-paper

    23/06/2026 e-paper

    मान्सूनपूर्व कामांचा पोलखोल

    मान्सूनपूर्व कामांचा पोलखोल