रेहम करो न्यायदेवते !

न्यायदेवता जर गोंयकारांवर रूसली, तर मग गोंयकारांना आणखी कुणाचाच आधार नाही, हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.

आपल्या देशाची लोकशाही जर टिकून आहे, तर ती फक्त न्यायव्यवस्थेमुळेच. उशिरा का होईना, पण न्याय मिळण्याची शक्यता आपल्या व्यवस्थेने दाखवून दिली आहे. न्यायव्यवस्था वजा केली, तर लोकशाहीसाठी उपयुक्त आणि आशेचा किरण उरत नाही. एवढे असूनही न्यायव्यवस्थेला बाटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अलिकडच्या काळात निवृत्तीनंतर न्यायाधीशांना मिळणारी संविधानिक पदे आणि काहींना मिळणाऱ्या राजकीय संधी पाहता, न्यायाधीशांना प्रलोभने देण्याचा किंवा प्रभावीत करण्याचा खटाटोप राजकीय व्यवस्था करत असल्याचे स्पष्ट दिसते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रकार ही आपल्या न्यायव्यवस्थेवरच घाला घालणारी कृती आहे. न्यायव्यवस्थेच्या निपक्ष आणि निर्भयपणावर दडपण आणण्याचा तो प्रयत्न आहे. तरीही अशा निंदनीय कृती करणाऱ्याच्या शाबासकीच्या आणि अभिनंदनाच्या पोस्ट वाचल्यानंतर आपण नेमके कुठल्या दिशेने वाहत चाललो आहोत, हेच कळेनासे झाले आहे. केंद्र सरकार निवडणूक आयोगानंतर आता न्यायसंस्थेलाही गृहीत धरू लागले आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. वेगवेगळ्या न्यायालयांचे ऐतिहासिक निवाडे पाहिल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या मनात न्यायव्यवस्थेबाबत आदर आणि विश्वास निर्माण होत असताना, काही गोष्टी मात्र खटकणाऱ्या ठरत आहेत. अर्थात, या गोष्टींबाबत जाहीर वाच्यता करणे अवमान ठरू शकते, म्हणून हे सगळे आतल्याआत गिळून गप्प राहावे लागते. आपल्या संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. तर मग न्यायसंस्थेचा अपमान न करता, आपल्या मनातील किंतु आणि संशय व्यक्त करून त्यात पारदर्शकता आणि खुलेपणा आणण्यात नेमकी काय चूक आहे? गोव्यात जनहित याचिकांची एक मोठी परंपरा आहे. अनेक महत्त्वाच्या विषयांवर जनहित याचिकांनी न्याय मिळवून दिला आहे. “उडदामाजी काळे गोरे” या प्रकरणात जनहित याचिकांचा स्वहितासाठी वापर होणे स्वाभाविक आहे. परंतु याचे निमित्त करून प्रामाणिक याचिकांबाबतच न्यायसंस्थेकडून संशय किंवा घृणा निर्माण होणे कितपत योग्य आहे?
हल्ली मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अनेक जनहित याचिका बारीकसारीक गोष्टींचे दाखले देऊन फेटाळल्या जात असल्याचे दिसून येते. याचिकादारांना लोकसच्या कचाट्यात अडकवून थेट नकार दिला जातो. लोकसचाच विषय घेतला, तरी एक बस व्यवसायिक असूनही सुदीप ताम्हणकर यांच्यासारख्या आरटीआय कार्यकर्त्याने अनेक जनहित याचिकांद्वारे राज्याला आणि वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आहे. गोवा फाउंडेशनसारख्या संस्थेने गोव्यासाठी दिलेले न्यायालयीन योगदान विसरता येणार नाही. प्रत्येक वंचित घटक न्यायालयाकडे न्याय मागण्यासाठी येऊ शकत नाही. कुणीतरी त्यांच्यासाठी जनहित याचिकेद्वारे न्याय मागत असेल, तर त्यांना नाकारणे योग्य ठरत नाही. याचिकादाराचा वैयक्तिक स्वार्थ असेल, तर तो उघड करण्यात न्यायालयाला अडथळा नाही. परंतु काही याचिकांबाबत पूर्वग्रह ठेवून प्रामाणिक आणि महत्त्वाच्या याचिकांचाही एकतर्फी निकाल लावला जात असल्याने गोव्याच्या सामाजिक चळवळीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. न्यायदेवता जर गोंयकारांवर रूसली, तर मग गोंयकारांना आणखी कुणाचाच आधार नाही—हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President